दुर्देवी : झोपडीला आग, १९ शेळ्यांचा होरपळून मृत्यू

0

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

अमळनेर  तालुक्यातील झाडी गावातून मन हादरवून टाकणारी घटना घडली आहे. आज पहाटे अडीच वाजेच्या सुमारास झोपडीला अचानक आग लागल्याने  १९ शेळ्यांचा जळून मृत्यू झाला असून दोन शेळ्या गंभीर भाजल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, शिवदास यादव भिल यांच्या मालकीच्या शेळ्या होत्या. घराच्या मागील बाजूस असलेल्या झोपडीत बकऱ्या बांधलेल्या होत्या. दरम्यान  पहाटे अडीच वाजेच्या सुमारास आग लागल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. आरडाओरडा करून आजूबाजूच्या नागरिकांना बोलावले. अमळनेर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तुषार नेरकर यांना घटना कळवताच त्यांनी अग्निशमन बंब पाठवला. अग्निशमन दलप्रमुख दिनेश बिऱ्हाडे, फारुख शेख, आनंदा झिम्बल यांनी आग विझवली.

मात्र तोपर्यंत १९ शेळ्यांचा मृत्यू झाला होता. या शेळ्यांवर उदरनिर्वाह असल्याने शिवदास यादव भिल यांचे कुटुंब उघड्यावर आले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.