Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • नशामुक्त युवा अभियानासाठी समन्वयाने काम करा!
    • दिव्यांग निवासी शाळेतील गंभीर अनियमितता!
    • विदगाव पुलाजवळ सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!
    • मनोज पाटील, शरद शिंदे, विनोद तराळसह संशयितांचे जामीन फेटाळले!
    • शाळांमधील विद्यार्थ्यांची सुरक्षा चिंतेचा विषय!
    • मराठी भाषा विभागाच्या सात संकेतस्थळांचे नव्या डोमेनवर स्थलांतर पूर्ण
    • ९ ऑगस्टला मोफत कायदेविषयक मार्गदर्शक शिबिर
    • फ्रीलांस करिअरच्या संधी
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»जळगाव जिल्हा»बॅक वॉटरमुळे ऐनपुर-निंबोल गावाचा संपर्क तुटला
    जळगाव जिल्हा

    बॅक वॉटरमुळे ऐनपुर-निंबोल गावाचा संपर्क तुटला

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveSeptember 16, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    ऐनपुर ता.रावेर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

    मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस सुरू असल्याने ऐनपुर येथील नदी नाले बॅक वाटरने भरून गेले आहे तर ऐनपुर निंबोल या दोन गावांचा संपर्क तुटला आहे. विशेष म्हणजे आज शनिवार असल्याने ऐनपुर गावाचे आठवडे बाजार असल्याने या बाजारात येणाऱ्या बहुतेक विक्रेते आणि निंबोल, विटवे तसेच लहान मोठ्या खेड्यातील लोकांना याच रस्त्याने यावे लागते. विक्रेत्या आणि बाजारात येणाऱ्यांसाठी पर्यायी मार्ग अवलंबावा लागण्याची शक्यता आहे म्हणजेच एकंदरीत त्यांना कमालीची कसरत करावी लागणार आहे.

    तसेच हतनूर बॅक वाटरचे पाणी व पावसाचे पाणी सुरूच असल्याने त्याच रस्त्याने रहिवास असलेल्या काही पावरा आदिवासी बांधवांना तसेच या वाढत असलेल्या बॅक वाटरच्या पाण्याच्या काही अंतरावरच बऱ्याच लोकांचा रहिवास आहे. ही गंभीर समस्या प्रशासनासमोर आहे.

    घरांच्या पुनर्वसनाचा प्रश्न कायमच

    पावसाळ्यात सतत कमी जास्त पाऊस पडल्याने हतनूर बॅक वाटरचे पाणी वाढून नदीकाठी रहिवास असलेल्या लोकांना याचा धोका निर्माण होतो तसेच या समस्येसाठी ऐनपुर पुनर्वसन समितीमार्फत २०१६ साली पासून ते अद्यापपर्यंत वेळोवेळी विविध असे निवेदन, आंदोलन, भूमिगत आंदोलन हे करण्यात येत आहे.  तरी प्रशासनाकडून कोणतेही ठोस अशी भूमिका होत नसल्याचे समजते. अशा समस्येचा धोका उद्भवल्यास यास कोण जबाबदार राहणार असा प्रश्न मात्र ही परिस्थिती बघून निर्माण होत आहे.

    Ainpur Raver
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    विदगाव पुलाजवळ सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!

    August 8, 2026

    मनोज पाटील, शरद शिंदे, विनोद तराळसह संशयितांचे जामीन फेटाळले!

    August 8, 2026

    धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदील

    August 7, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif