अहमदनगरच्या कल्याण-निर्मळ महामार्गावर भीषण अपघात, दोन्ही वाहन चालकांचा जागीच मृत्यू

0

अहमदनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क

अहमदनगरच्या कल्याण-निर्मळ महामार्गावरील करंजी घाटात ट्रक आणि टँकरची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात दोन्ही वाहनांच्या चालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, अहमदनगर मध्ये भीषण अपघात झाला आहे, कल्याण-निर्मळ महामार्गावरील पाथर्डी तालुक्यातील करंजी घाटात रात्री उशिरा साडेबारा वाजण्याच्या सुमारास ट्रक आणि दुध टॅंकरचा भीषण अपघात झाला.

अपघात झालेला ट्रक पैठणवरुन शेंगदाण्याचे कट्टे घेऊन नगरकडे रवाना होत होता. तर दुधाचा रिकामा टँकर करंजीकडे येत होता. दोन्ही वाहने करंजी घाटात आली असता समोरा-समोर धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की दोन्हीही वाहनांचा अक्षरशः चक्काकूर झाला. या भयंकर अपघातात ट्रक चालक जावेद मन्सुर शेख आणि टँरर चालक शिवाजी नानासाहेब भवार हे दोघे जागीच ठार झाले. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी धाव घेत

Leave A Reply

Your email address will not be published.