मुंबईत भीषण आग, दोन जणांचा होरपळून मृत्यू

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

मुंबईतील गिरगाव चौपाटी भागातून आगीची मोठी दुर्घटना समोर आली आहे. गिरगावमध्ये एका चार माजली इमारतीला आग लागली आहे. या आगीत दोन जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तीन मजली इमारतींच्या तिसऱ्या मजल्यावर शनिवारी रात्री आग लागली. या आगीच्या घटनेटची माहिती मिळाल्यावर अग्निशमनदलाच्या १५ गाड्या दाखल झाल्या. अग्निशन दलाचे दोन तास प्रयत्न केल्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवले. यावेळी नऊ जणांचा रेस्क्यू करून काढलेल्या ९ जणांना रुग्नालयात दाखल करण्यात आले आहे.

आगीचे कारण काय
गिरगावमध्ये ही आग कशामुळे लागली. याबाबत अधिकृत माहिती मिळाली नाही. परंतु पोलिसांनी या प्रकरणाची नोंद केली आहे. पोलीस आणि अग्निशनदलाचे जवान ही आग कशामुळे लागली, याचे कारण शोधत आहेत. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आगीच्या घटनेमुळे परिसरातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.