पतंग उडविताना तोल जाऊन १० वर्षीय मुलाचा मृत्यू

0

लोकशाही न्यूज नेटवर्क
धरणगाव –तालुक्यातील मूळचे कळमसरे येथील रहिवासी तर सध्या हिंगोणे येथे राहत असलेल्या दहा वर्षाच्या बालकाचा आज पतंग उडवतांना विहिरीत पडल्याने मृत्यू झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे .
आज मकर संक्रांती निमित्त सर्वत्र पतंगोत्सव साजरा केला जात आहे . तथापि , यात काळजी न घेतल्यास दुर्घटना घडत असतात . अशीच एक दुर्घटना धरणगाव तालुक्यातील हिंगोणे येथे घडली आहे . येथे मूळचे अमळनेर तालुक्यातील रहिवासी असलेले महाजन ( माळी ) कुटुंब उदरनिर्वाहानिमित्त स्थायिक झालेले आहे . याच कुटुंबातील अक्षय संजय महाजन ( माळी ) हा बालक आज पतंग उडवत होता . याप्रसंगी त्याचा तोल जाऊन तो विहिरीत पडला . यामुळे त्याचा मृत्यू झाला .
अक्षय माळी हा पाचवीत शिकत असून तो विहिरीत पडल्याचे कळताच परिसरातील लोकांनी धाव घेऊन त्याला बाहेर काढले . मात्र तोवर त्याची प्राणज्योत मालविली होती . यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे . तर हिंगोणे आणि कळमसरे गावावर यामुळे शोककळा पसरली आहे . मुलांनी पतंग उडवतांना सावधगिरी बाळगण्याची गरज असल्याचे यातून पुन्हा एकदा अधोरेखीत झाले आहे .

Leave A Reply

Your email address will not be published.