मुक्ताईनगर | प्रतिनिधी
नायगाव येथे प्रवज्जा फाऊंडेशन नायगाव येथे सामूहिक विवाहात ५१ जोडपी विवाहबद्ध झाली.सदरचा लग्नविधी बौद्धाचार्य. तथा जिल्हा अध्यक्ष शैलेन्द्र जाधव यांचे हस्ते पार पडला.कार्यक्रमाचे अध्यक्ष उद्योजक दीपरत्न तायडे होते.तर प्रमुख उपस्थिती प्रा.गौतम निकम सर; डॉ.अ.फ.भालेराव ; जयपाल भाऊ बोदडे: विनोद भाऊ सोनवणे;एन.जी.शेजोळे ;भागवत पाटील; किशोर चौधरी; विनोद भाऊ तराळ होते.
या वेळी डॉ.अ.फ.भालेराव मनोगत व्यक्त करतांना म्हणाले की”बंधू भगिनींनो डॉ . बाबा साहेब आंबेडकर यांनी आपल्याला “धम्माच्या ओटीत टाकलं.म्हणुन जीवनाचं सोनं झालं. धम्मामुळे आम्हाला माणूस पण मिळालं.बौद्ध धम्म हा जागतिक धम्म आहे.माणसाला माणुसपण देण्याचं काम “धम्म “करतो.आज सर्व जग बुद्धाचा विचार स्वीकारत आहे. नंतर प्रा.गौतम निकम (चाळिसगाव) यांनी आयोजक यांचं कौतुक केलं.असे सामुहिक विवाह सोहळे झाले पाहिजे.बुलढाणा जिल्हा भारतीय बौद्ध महासभेचे वंदे गुरूजी यांनी मनोगत व्यक्त केले.विनोद भाऊ तराळ यांनी मनोगत व्यक्त केले.स़ंचलन दिपक भाऊ इंगळे तर आभार सारीपुत्त गाढे यांनी मानले.
या वेळी सर्व समाजाचे मान्यवर हजर होते.समाजातील मान्यवर यांचा ही धम्म कार्य साठी गौरविण्यात आले.
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.