छत्रपती संभाजीनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क:
नदीत अंघोळीसाठी गेलेल्या चार मित्रांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ते षष्ठी निमित्ताने देवदर्शनासाठी गेले होते. या पैकी दोन जणांचे मृतदेह सापडले असून इतरांचा शोध सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कायगाव टोका येथील नदीपात्रात ही घटना घडली आहे. वैजापूर तालुक्यातील हे चारही तरुण गेले होते देवदर्शनासाठी गेले होते. षष्ठी निमित्ताने नेहमी देवदर्शनासाठी जाण्याची परंपरा आहे. त्यामुळे वैजापूर इथं राहणारे चारही मित्र कायगाव टोका इथं गेले होते. नदीपात्रात अंघोळ करून देवदर्शनासाठी जावे लागते. त्यामुळे चारही तरुण नदीत उतरले, पण पाण्याचा अंदाज न आल्याने चौघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. आतापर्यंत बाबासाहेब अशोक गोरे आणि शंकर पारसनाथ घोडके यांचे मृतदेह सापडले आहे. असून दोन जणांचा शोध सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांनी कायगाव टोकाकडे धाव घेतली आहे. घटनास्थळी पोलीस पोहोचले असून स्थानिक मच्छिमारांच्या मदतीने मृतदेहांचा शोध घेतला जात आहे.