अहमदनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क:
अहमदनगर जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक वृत्त समोर आले आहे. येथील टाकळी काझी गावात तीन मुलांना लिंबू सरबतमुळे विषबाधा झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या विषबाधेमुळे दोन सख्ख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. शिवराज बापू म्हस्के (४.५) आणि स्वराज बापू म्हस्के (१.५) अशी मृत्यू झालेल्या चिमुकल्यांची नावं आहेत.
नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलांनी स्वत: लिंबू सरबत बनवलं होत. त्यानंतर त्यांना उलटीचा त्रास होऊ लागला आणि त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान, एका मुलाचा सकाळी तर एका मुलाचा सायंकाळी मृत्यू झाला. तर तिसऱ्या मुलावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सार्थक भाऊसाहेब म्हस्के या १४ वर्षीय मुलावर खासगी रुग्णलयात उपाचार सुरु आहेत. वडील बापू म्हस्के हे गवंडी काम करतात तर आई स्वप्नाली बापू म्हस्के या घर काम करतात. दोन्ही मुलं गेल्यानं आई-बापावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.