जळगाव ;-
नागरिकांचे आरोग्य धोक्यात येईल अशा मनपा हद्दीत वराह पालन करणाऱ्या चौघांना मनपाने नोटीस बजावली असून जर या नोटिसीचे पालन न केल्यास पुढील कारवाई करण्याचा इशारा सर व्यक्तींना देण्यात आला आहे .
महापालिका हद्दीत नागरिकांच्या आरोग्याला बाधा ठरू शकणाऱ्या वराह या प्राण्यांना विनापरवाना हद्दीत आणून त्यामुळे नागरिकाने याचा कुठलाही त्रास होऊ नये यासाठी वराह मालकांना नोटीस बजावण्यात आली आहे त्यात मंगलसिंग बागडे, पूनम साळुंखे , चंद्राबाई कंजर,अर्जुन कंजर या चौघांवर कारवाई करण्यात यावी अशी फिर्याद आरोग्य अधीक्षक हाफिज उल्ला खान मोजदार खान यांनी पोलीस अधीक्षकांना दिली आहे .