शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजार द्या ; अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी भाजपची आक्रमक भूमिका

0

नागपूर : नागपूरच्या विधिमंडळ अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात विरोधी पक्ष भाजपाने शेतकऱ्यांच्या मदतीवरुन आक्रमक भूमिका घेतली.

उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजार रुपयांची मागणी केली होती. त्याचीच आठवण भाजपने करुन देताना, ‘सामना’च्या बातमीच कात्रण पोस्टररुपात झळकावून, भाजपने आक्रमक पवित्रा घेतला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजार रुपये देण्याची मागणी केली होती, मग आता तेच मुख्यमंत्री आहेत, त्यांनी तातडीने शेतकऱ्यांना 25 हजाराची मागणी द्यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप आमदारांनी केली. पुरवणी मागण्यांमध्ये हेक्टरी 25 हजार रुपयांच्या तरतुदीचा उल्लेख नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत देण्याची सरकारची भावना नाही, असा आरोप फडणवीसांनी केला.

Leave A Reply

Your email address will not be published.