जळगाव दि . 31
शिवाजीनगर येथील रहिवासी महिला जयश्री विष्णू दळवी या नव्याबस स्टँण्डवरून दि.30 रोजी रिक्षा क्र. एम.एच. 19 जे 8851 ने घरी गेल्या.परंतु अनवधानाने त्या आपली बॅग रिक्षातच विसरून गेल्या. या प्रकरणी दळवी यांनी शहर पोलिसात या प्रकरणी खबर दिली. बॅगमध्ये 6 हजार रू. रोख व दोन तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र होते. ही बाब लक्षात येताच त्यांनी रिक्षावाल्याचीही शोधाशोध सुरू केली. प्रारंभी तपास काही लागला नाही;परंतु 31रोजी रिक्षावाले राजेंद्र पुंडलिक पाटील हे स्वत: दळवी यांच्या घरी आले व त्यांची बॅग प्रामाणिकपणे परत केली.आपल्या वस्तू परत मिळाल्याने मिसेस दळवी यांच्या जीवात जीव आला. जगात आज फसवाफसवीच्या, चैन चोर्यांच्या, जबरी लुटीच्या घटना घडत असतांना या रिक्षाल्याने सिध्द करून दाखविले आहे की, जगात अजूनही प्रामाणिपणा जिवंत आहे.
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Next Post