अमळनेर, प्रतिनिधी – कन्हेरे या गावाला बस थांबा नसल्यामुळे बस थांबत नव्हती. परिणामी गावातील विद्यार्थ्यांना अमळनेर येण्यासाठी खूप अडचण होत होती. या अडचणीचं निराकरण तालुक्याचे आ. अनिल पाटील व राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष श्रीनाथ पाटील आणि शहराध्यक्ष सुनिल शिंपी यांनी केले.
आठ दिवसापूर्वी या गावातील विद्यार्थी त्यांची समस्या घेऊन आमदार अनिल भाईदास पाटील यांच्याकडे गेले होते. ताबडतोब आ.अनिलदादांनी, श्रीनाथ पाटील, सुनील शिंपी, सनी गायकवाड यांना डेपोला पाठवले. डेपोने ग्रामपंचायतचा ठराव मागितला असता तो त्यांना दिला व येत्या 4 ते 5 दिवसात तिथे थांबा होईल. असे आश्वासन डेपो मॅनेजर श्रीमती भदाणे मॅडम यांनी दिले. ग्रामपंचायत ठराव देतांना कन्हेरे गावातील विद्यार्थीनी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष श्रीनाथ पाटील, शहराध्यक्ष सुनील शिंपी, सनी गायकवाड, महेंद्र पाटील, मयुर पाटील, योगेश पाटील, शत्रुघ्न पाटील, ऋषिकेश पाटील हे कन्हेरे गावातील विद्यार्थी उपस्थित होते.