भुसावळ( प्रतिनिधी ) संविधान समिती तर्फे सीएए व एनआरसी विरोधात गुरुवार आज 26 रोजी सकाळी 11 वाजता खडका रोड येथील रजा टॉवर पासून मोर्चा काढण्यात आला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, मॉडर्न रोड, बाजारपेठ पोलीस स्टेशन मार्गे हा मोर्चा प्रांत कार्यालयावर गेला. यावेळी प्रांतकार्यालयात शिरस्तेदार यांना निवेदन देण्यात आले. सीएए, एनआरसी रद्द करावे अशी मागणी करण्यात आली. प्रांताधिकारी कार्यालया दरम्यान मूक मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. या मोर्चात सर्व पक्षीय लोकांचा समावेश होता. धर्मगुरू व शिष्ट मंडळ यांनी निवेदन दिले. हजारोच्या संख्येने मुस्लिम बांधव मोर्चात सहभागी झाले होते.
यात संविधान समितीचे सदस्य हाजी सलीम सेठ चुडीवाले,पीआर पी चे महामंत्री जगन सोनवणे,आरपीआयचे राजू सुर्यवंशी,
जे बी कोटेचा, इस्माईल गवळी, ऍड .एहतेश्याम मलिक ,राष्ट्रवादीचे मुन्ना सोनवणे , फिरोज शेख, मुनव्वर खान, माजी नगरसेवक साबीर शेख, नगरसेवक मुन्ना तेली, युनूस मामा, प्रा.दिलीप तायडे ,राजू तेलोरे, माजी आमदार नीळकंठ फालक, बबलू भाई किराणा व अय्यूब खान , चिराग सेठ, जलील कुरेशी , शेख शफी शेख अजीज , शंकर झुंगारेकर ,इम्रान खान इद्रीम खान, युनूस मामा, प्रा. दिलीप तायडे ,बबलू भाई किराणा व अय्यूब खान ऍड. एहतेशाम देशमुख शेख आरीफ शेख गुलाम, युनूस मामा, जुनेद खान, दानिश पटैल,
, आदींसह सर्व धर्मीय समाज व मुस्लिम बांधव हजारोच्या सहभागी झाले होते .