भुसावळच्या राजश्री नेवे खान्देश गौरव पुरस्काराने सन्मानित

0
भुसावळ (प्रतिनिधी ) – येथील सखी श्रावणी महिला बहुउद्देशीय संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष सौ  राजेश्री उमेश नेवे यांना सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल  नुकताच
अडावद ता.चोपडा येथिल आदिलशाह फारुकी बहुउद्देशिय संस्थेच्या वतीने खान्देश गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले .पुरस्काराचे स्वरूप शिल्ड, मानपत्र व मेडल असे आहे .
  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री गुलाबराव देवकर हे होते.
यावेळी महाराष्ट्रच्या विविध जिल्ह्यातील मान्यवर उपस्थित होते. दीप प्रज्वलन अंकुर साहीत्य परिषदेचे सह सचिव हकीम चौधरी , मुक्ताईनगर यांच्या हस्ते करण्यात आले.
संस्था अध्यक्ष फारुख शहा नौमानी यांनी प्रास्ताविक सादर केले तसेच सुरेश जनार्दन बोरसे , मुक्ताईनगर यांनी सूत्र संचालन केले.
यावेळी सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, कृषी, पत्रकारिता, लेखन, काव्य आदी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या यावेळी विविध क्षेत्रातील 35 मान्यवरांनाही पुरस्कार देवून   सन्मानित करण्यात आले.यावेळी मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्याक्ष प्रवीण पाटील, अली अंजुम रज़्वी, जावेद शेख, दिगंबर पाटीलअडावद, यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमात रियाझ शेख नागपूर, नुरुद्दीन मुल्लाजी कासोदा, सुनीता अशोकराव नागपूर, फिरोज शेख जळगाव, गणेश परदेशी, हारून  अन्सारी, अजमल शाह,जळगांव, असगर शाह भुसावळ, फारुख शेख जळगांव, आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शेख जाविद यावल, शेख अय्युब यावल, जुबेर शाह अडावद, रोशन शहा नशिराबाद,शेख अल्ताफ यावल, जावेद शेख पाचोरा, असिफ शहा यावल आदींनी प्रयत्न केले .आभार संस्था अध्यक्ष फारूक शहा नौमानी यांनी व्यक्त केले.
  सौ राजेश्री नेवे यांना येत्या
२३ फेब्रूवारी व ८ मार्च महिला दिनानिमित्त सुद्धा  पुरस्कार  जाहिर झाले आहे.  यांच्या कार्याचे कौतुक सर्व स्तरातून होत आहे .

Leave A Reply

Your email address will not be published.