भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन रद्द करावे

0

जळगाव  प्रतिनिधी (कुणाल दांडगव्हाळ )

तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी काल भाजपच्या 12 आमदारांना निलंबित केलं आहे. त्या  आमदारांचे निलंबन त्वरित रद्द करावे असे निवेदन आज  जिल्हाधिकाऱ्यांना भाजपा ओबीसी मोर्चा जळगावच्या वतीने देण्यात आले.

तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांच्या प्रस्ताव  निषेध  त्या भाजपच्या १२ आमदारांचे निलंबिन त्वरित रद्द करा अशी मागणी भाजपा ओबीसी मोर्चा वतीने करण्यात येत आहे.  भाजपचे आ. राजूमामा भोळे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देताना जिल्हा महानगरचे अध्यक्ष दीपक सुर्यवंशी व मनपा स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि जिल्हा महानगराध्यक्ष जयेश भावसार यांच्या उपस्थितीत देण्यात आले.

या वेळी  जिल्हा महानगर सरचिटणीस विशाल त्रिपाठी, डॉ. राधेश्याम चौधरी, महेश जोशी, महिला मोर्चा प्रदेश उपध्यक्ष उज्ज्वला बेंडाळे, विधानसभा क्षेत्र प्रमुख दिपक साखरे, चिटणीस प्रा. भगतसिंग निकम, महानगर सोशल मीडियाचे अक्षय चौधरी, मंडल अध्यक्ष अजित राणे, ओबीसी आघाडी महानगर सरचिटणीस विजय बारी, ओबीसी आघाडी महिला संपर्क प्रमुख, पुजा चौधरी, अमित शिंदे यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.