भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेवर पोलिसांचा दणका

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

कोविडच्या पार्श्वभूमीवर गर्दी जमवायला परवानगी नसताना देखील भाजपने जन आशीर्वाद यात्रा काढली. या भाजपाच्या जन आशीर्वाद यात्रेला मुंबई पोलिसांनी चांगलाच  दणका दिला आहे. केंद्र सरकारची कामे जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी जन आशीर्वाद यात्रा सुरु करण्यात आली.  मात्र या यात्रेवर मुंबई पोलिसांनी 36 हून अधिक गुन्हे दाखल केले आहेत.

19 ऑगस्ट रोजी विलेपार्ले, खेरवाडी, माहीम, शिवाजी पार्क, दादर, चेंबूर, गोवंडी पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले. त्यानंतर आता गुन्ह्यांची संख्या 36 वर पोहोचली आहे. जन आशीर्वाद यात्रेची परवानगी नसतानाही ती काढल्यानं पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.