लोकशाही न्यूज नेटवर्क
ब्राझीलच्या दक्षिणेकडील अनेक भागांत आलेल्या जोरदार पावसामुळे इथे आणिबाणीची स्थिती निर्माण झाली असून आतापर्यंत २९ जणांचा मृत्यू झाला असून ६० जण बेपत्ता आहेत.
या पर्जन्यवृष्टीने या भागातील एक लहान धरणही फुटले आहे.
ब्राझीलच्या दक्षिणेकडील राज्य असलेल्या रिओ ग्रेंडे डो सुल या ठिकाणी आपत्कालीन स्थिती निर्माण झाली आहे. या ठिकाणी २९ जणांचा मृत्यू झाला आहे तर ६० जण बेपत्ता असून १० हजाराहून अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. पावसाचा फटका या राज्यातील १५४ शहरांमध्ये बसला आहे. ही अत्यंत भीषण स्थिती आहे, असे राज्याचे गर्वनर इडुरडो लेईटी यांनी प्रसार माध्यमांना सांगितले. गेल्या काही दिवसांपासून ३ लाखांहून अधिक लोकांना वीजेशिवाय राहावे लागत आहेत. वीजनिर्मिती करणारे एक धरणही फुटल्यामुळे वीजपुरवठा खंडीत झाला आहे. ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लियुझ लुला दा सिल्व्हा यांना पूरग्रस्त भागात जाऊन गर्वनरांची भेट घेत चर्चा केली. ब्राझीलचे केंद्र सरकार या परिस्थितीत सर्वतोपरी मदत करेल, असे त्यांनी यावेळी सांगितले. ब्राझीलच्या साओ पावलो राज्यात गेल्या वर्षी आलेल्या पावसात ५० जणांचा मृत्यू झाला होता.