नवी दिल्ली ː
पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये शनिवारी(दि.2) भारतीय उच्च आयुक्तालयाने आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीत आलेल्या पाहुण्यांसोबत पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी गैरवर्तणूक केल्याचा आणि त्यांना धमकावल्याचा प्रकार समोर आला आहे. इतक्यावरच न थांबता त्या पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी पाहुण्यांना कार्यक्रम स्थळावरुनही बळजबरीने परत पाठवलं. या घटनेमुळे भारत-पाकिस्तानमधील वातावरण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे.
पाकिस्तानने विविध क्रमांकांवरून पाहुण्यांना धमकी दिली की, भारताच्या इफ्तार पार्टीत सहभागी झालात, तर गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल. यानंतर पाकिस्तानात भारतीय उच्चायुक्त अजय बिसारिया म्हणाले की, आम्ही त्या सर्व पाहुण्यांची माफी मागतो, ज्यांना शनिवारी बळजबरी पाठवण्यात आले. हे कृत्य निराशाजनक आहे.
Indian High Commissioner to Pakistan Ajay Bisaria to ANI: We apologise to all our guests who were aggressively turned away from our Iftar yesterday. Such intimidatory tactics are deeply disappointing (file pic) 1/2 pic.twitter.com/3skZWBa0jq