नैराश्यातून तरुणाने घेतला गळफास

0

 जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जळगाव तालुक्यातील शिरसोली प्र.न. येथील तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.

शिरसोली प्र.न. येथील बसस्थानकाजवळ पुनमचंद श्रावण बारी(वय ४०) यांच्या पानटपरीला भरधाव वेगाने येणारी एम.एच.२० ई.एल.७५८१ क्रमांकाची मालवाहू पिकअपने धडकली होती. यात पानटपरी जमीनदोस्त झाल्यामुळे पानटपरी मालक पुनमचंद श्रावण बारी तणावात होते. पानटपरीची नुकसान भरपाई देतो असे मालवाहू पिकअप वाहन मालकाने पहिले सांगितले होते. नंतर दोन दिवसांनी मात्र पिकअप वाहन मालक नुकसान भरपाई देत नाही असे सांगितल्या नंतर पुनमचंद बारी यांना प्रचंड नैराश्य आले होते.

दरम्यान, नैराश्यात पानटपरी मालक पुनमचंद बारी यांनी आज सकाळी ७:३० वाजता राहात्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.  याबाबत जळगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनला नोद करण्यात आली आहे. बारी यांच्या पश्चात पत्नी, २ मुले, १ भाऊ, १ बहिण, आई- वडील असा परिवार आहे.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.