नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विम्याची रक्कम त्वरित मिळावी; मनसेचे निवेदन

0

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

तालुक्यातील शेतकऱ्यांना चक्रीवादळामुळे मुक्ताईनगर तालुक्यातील शेतकरी बांधवांचे फळबागांचे मोठे प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यातील विमाधारक शेतकऱ्यांना अजून पर्यंत विम्याची रक्कम मिळाली नाही. तरी त्यांना त्वरित विम्याची रक्कम मिळावी त्यासंदर्भात जिल्हा व तालुक्यातील मनसे  पदाधिकारी यांनी निवेदन दिले.

निवेदन देते वेळी मनसे जिल्हा उपाध्यक्ष राहुलभाऊ काळे, अतुलभाऊ जावरे विधानसभा अध्यक्ष, मधुकरभाऊ भोई तालुका अध्यक्ष, श्रीराम भोई, मंगेश कोळी, अतुल कोळी, दिनेश बाविस्कर, सुरेश बोडखे, सुनील कोळी, नीलेश सापधारे, दीपक दुट्टे, मुकेश झा, गोपाळ वाघ, गोपाळ कोळी, हेमंत गुलगे इत्यादी मनसे सैनिक व पदाधिकारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.