दोन दिवसात तालुका काँग्रेस कार्यालयाचे कुलुप तोडणार

0

अ‍ॅड. संदिप पाटील, दोन तालुकाध्यक्षांच्या वादात कार्यालय बंदच

जळगांव.दि.26-
गेल्या दोन तीन महिन्यांपासून तालुका काँग्रेस कमिटी कार्यालय दोन तालुकाध्यक्षांच्या वादात कुलुपबंद अवस्थेत असून तालुका पक्ष पदाधिकार्यांना बैठका अन्यत्र घ्यावा लागत असल्याने येत्या दोन दिवसात प्रसिद्धी माध्यमांसमोर तालुका कार्यालयाचे कुलुप तोडण्यात येणार असल्याचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. संदिप पाटील यांनी दै. लोकशाहीशी बोलतांना सांगीतले.
जळगांव तालुका काँग्रेस कमीटी अध्यक्षपदी संजय वराडे कार्यरत होते. पदाधिकारी कार्यकर्ते तसेच सर्वसामान्यांकडून पक्ष कार्यालयाकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या. याची दखल वरीष्ठ पातळीवरून घेण्यात आली होती. त्या संदर्भात वरीष्ठ नेते चेल्ला रेड्डी यांच्या समोर 26 जानेवारी रोजी झालेल्या चर्चेत तालुकाध्यक्ष संजय वराडे यांनी कार्यालयाच्या चाब्या जिल्हाध्यक्षांकडे देण्यात याव्यात असे सुचित करण्यात आले होते. तसे रितसर पत्र देखिल 2 मार्च रोजी वराडे यांना पाठविण्यात आले असल्याचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.पाटील यांनी सांगीतले. याशिवाय मनोज चौधरी यांची जळगांव तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आल्याचे यापुर्वीच 24 आक्टोबर 2018 रोजी अन्य तालुकाध्यक्षांची नियुक्ती सह सरचिटणीस अ‍ॅड. गणेश पाटील यांची सहि असलेले पत्र देण्यात आलेले आहे.

जिल्हा अध्यक्ष पदाचे दोन व्यक्ती काम पाहतात …मी शहराच्या तर संदीप भैय्या हे ग्रामीण चे बगतात …मी ग्रामीण विषयी काही ही बोलू शकत नाही…त्या बाबतीत पाटील हे ही अधिक व स्पष्ट बोलू शकतात..डॉ. राधेश्याम तिवारी
-डॉ. राधेश्याम चौधरी

 

पक्ष शिस्तीचा भंग वराडे यांनी केला असून त्यांना पक्ष पदावरून दुर करण्यात यावे. तालुकाध्यपदी नियुक्ती नुसार पक्षशिस्त व आदेशानुसार अन्य ठिकाणी बसून कार्य करीत आहे. जळगांव तालुकाध्यक्ष
– मनोज चौधरी

Leave A Reply

Your email address will not be published.