जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
३६ वर्षीय शेतकऱ्याने दारूच्या नशेत राहत्या घरात दोरीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आसोदा येथे घडली आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
तालुक्यातील आसोदा येथील रहिवाशी शेतकरी रमेश अशोक पाटील (वय ३६) आपल्या पत्नी व दोन मुलीसह राहतात. शेतीकाम करून आपल्या कुटुंबियाचा उदरनिर्वाह करतात. २३ सप्टेंबर रोजी त्यांची पत्नी शेतात काम करण्यासाठी गेल्या होत्या. तर दोन्ही मुली कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या.
सायंकाळी ७ वाजेच्या पुर्वी रमेश पाटील यांनी राहत्या घरातील पुढच्या खोलीत दोरीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केली. त्यांची पत्नी सायंकाळी शेतातून घरी आल्या, त्यावेळी हा प्रकार समोर आला. त्यांचा मृतदेह खाली उतरवून तातडीने जिल्हा रूग्णालयाने नेण्यात आला. वैद्यकीय अधिकारी डॉ. निता भोळे यांनी मयत घोषीत केले.
याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक किरण आगोणे करीत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, दोन भाऊ असा परिवार आहे.