जळगाव : – जिल्हा नियोजन मंडळाकडून जि.प.ला विकास कामांसाठी निधी मिळत असतो. तो वेळेत खर्च व्हावा यासाठी आता पासून नियोजन करा, कामे प्रलंबित राहील्यास दायित्व वाढते. त्यामुळे पावसाळा सुरू असतांना कामांना मान्यता घेवून या कामांनई पावसाळ्यानंतर सुरूवात करण्यासाठीची कार्यवाही आता पुर्ण करण्याच्या सुचना जि.पचे नुतन सीईओ श्री. अंकित यांनी सर्व विभाग प्रमुखांसह गटविकास अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील जलजीवन मिशन, आवास योजना यासह विविध योजनांचा आढावा घेतला.
जि.पच्या अधिकाऱ्यांची समन्वय समितीची सभा आज विभाग प्रमुख यांच्यासह बिडीओंच्या उपस्थितीत सानेगुरूजी सभागृहात पार पडली. यावेळ त्यांनी जलजीवन मिशनच्या कामांचा आढावा घेवून अडचणी बिडीओस्तरावर सोडविण्याच्या सुचना केल्या. तसेच निधीचा योग्य विनीयोग व्हावा यासाठी कामांच्या यादया तात्काळ तयार करून त्यांची प्रशासकीय मान्यता, तांत्रिक मान्यता घ्या व पावसाळ्या नंतर कामांना सुरूवात होण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याच्या सुचना दिल्या. या बैठकीत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी भेट देवून बिडीओ व अधिकाऱ्यांशी संवाद साधला. आवास योजनांमध्ये जागांबाबत येत असलेल्या अडचणी जि.प व महसुल विभाग समन्वयाने सोडवेल असे आश्वासन त्यांनी दिले. शासनाच्या योजनांचे काम करतांना ते प्रलंबित ठेवू नका, अडचणी असल्यास त्या तात्काळ सोडविल्या जातील असे आश्वासन त्यांनी दिले.