कोरोना: पोलिसांबाबत राज्य सरकारने केली मोठी घोषणा

0

मुंबई : राज्यात करोनाने हैदोस घातला आहे. राज्यातील कोरोनाबाधीतांची संख्या ४९० वर गेली आहे. दरम्यान,  जीवमुठीत घेऊन कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांबाबत राज्य सरकारने मोठी घोषणा केली आहे. ड्युटीवर असताना करोनामुळे दुर्देवानं मृत्यू ओढवल्यास पोलिसांच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपये देण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात एक महत्तवपूर्ण बैठक पार पडली. यावेळी हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला गृहमंत्री अनिल देशमुख, आरोग्यमंत्री राजेश टोपे, अर्थ विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सौनिक आदींसह अर्थ, आरोग्य, उद्योग विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.