अर्णब गोस्वामी हा भाजपचा कार्यकर्ता ; संजय राऊतांची टीका

0

मुंबई : ‘अर्णब गोस्वामी हा भाजपचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे भाजपचे कार्यकर्ते हे देशभरात रस्त्यावर उतरले आहे. कदाचित हा त्यांचा राष्ट्रीय कार्यक्रम असेल तर त्यांनी तो करावा, असा टोला शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक केल्यामुळे भाजपने राज्यभरात आंदोलन पुकारले आहे. पण, ‘अर्णब गोस्वामी हे भाजपचे कार्यकर्ते आहे, आपल्या कार्यकर्त्याने नेमका काय गुन्हा केला आहे, हे एकदा समजून घ्या’, असा सल्लावजा टोला संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना लगावला. तसंच, ‘अर्णब गोस्वामी हा भाजपचा लाऊड स्पीकर आहे’ असा टोलाही त्यांनी लगावला.

‘भाजप नेत्यांनी आंदोलन करण्याआधी अन्वय नाईक यांच्या घरी जाऊन त्यांच्यावर काय संकट कोसळले आहे, हे समजून घेतले असते तर कोणत्याही व्यक्तीला मन आहे, मग तो राजकीय नेता असता तर त्याने रस्त्यावर उतरण्याचे काम केले नसते, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही’ असंही राऊत म्हणाले.

‘रिया चक्रवर्ती प्रकरणात तुमची वेगळी भूमिका असते, आणि अन्वय नाईक आणि त्यांच्या आईबद्दल वेगळी भूमिका घेणे याला राज्यकर्म म्हणता येणार नाही. महाराष्ट्राचे पोलीस हे कठपुतलीच्या बाहुल्या नाही. जे रिया चक्रवर्ती प्रकरणात झाले, तसे इथं झाले नाही. महाराष्ट्र पोलीस स्वतंत्र्य पद्धतीने चौकशी करत आहे’ असंही राऊत म्हणाले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.