अपघाताचे सत्र सुरूच; तिघांचा जागीच मृत्यू

0

एरंडोल, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जळगाव जिल्ह्यात काही दिवसांपासून सुरू असलेल्या भीषण अपघातांचे सत्र सुरूच असून काल रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास भडगाव ते एरंडोल मार्गावर भरधाव कारने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

एरंडोल ते भडगाव रस्त्यावर अज्ञात चारचाकी वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली. रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. या अपघातामध्ये दुचाकीवर असणारे तिघे जागीच ठार झाले. या अपघातात बलदीप सुकटा पवार (वय ३२), बबलू बच्चन भोसले (वय २२) आणि गोटू पिंटू चव्हाण (वय १२) या तिघांचा समावेश आहे. या अपघाताची माहिती मिळताच परिसरातून ग्रामस्थांनी अपघातस्थळी धाव घेतली. तर संबंधीत कार चालकाने घटनास्थळावरून पलायन केले असून त्याचा शोध सुरू करण्यात आला आहे.

सदर अपघातातील मृतदेह शव विच्छेदनासाठी रूग्णालयात पाठविण्यात आलेले आहेत. तर रात्री उशीरापर्यंत या संदर्भात कासोदा पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

 

Leave A Reply

Your email address will not be published.