अंतिम वर्षाच्या परीक्षा घेणे सध्याच्या कोरोना परिस्थितीमुळे शक्य नाही

0

धरणगाव (प्रतिनिधी) : येथे युवा सेना व विद्यार्थी संघटनेचे वतीने शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ, नगराध्यक्ष निलेश चौधरी, शहर प्रमुख राजेंद्र महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली युवा सेना व भारतीय विद्यार्थी संघटनेचे वतीने तहसील येथे मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.

निवेदनात खालीलप्रमाणे मागण्या करण्यात आल्या.राज्यातील कोविड-19 चा वाढता प्रादुर्भावामुळे सद्यस्थितीत रुग्णांच्या संख्येत दररोज मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. त्यामुळे विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सुधारित मार्गदर्शक सूचनांनुसार अंतिम वर्षाच्या परीक्षा घेणे सध्याच्या कोरोना परिस्थितीमुळे शक्य नाही, असे म्हटले राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या राज्यातील कोविड-19चा वाढता प्रादुर्भाव आणि अंतिम वर्षाच्या परीक्षा घेऊच नये अशी शासनाची भूमिका नाही.तर राज्यातील कोविड-19 चा वाढता प्रादुर्भाव पहाता आशा परिस्थितीत आत्ता परीक्षा घेणे योग्य होणार नाही ही शासनाची भूमिका आहे.

सर्व 13 अकृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंनी सध्याच्या परिस्थितीत परीक्षा घेणे उचित होणार नाही हे शासनाला लेखी कळवले आहे. त्याचबरोबर पालक आणि शिक्षक यांचा देखील लगेच परीक्षा घेण्यास विरोध आहे. त्यामुळे अव्यावसायिक अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षातील परीक्षा आत्ता लगेच घेणे म्हणजे विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने योग्य नाही. युजीसी जर मार्गदर्शक तत्वे आम्हाला देते तर जबाबदारीही घेणार काय?

विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये, म्हणून त्यांना योग्य ते सूत्र वापरून त्यांचा निकाल घोषित करावा आणि पुढे कोविड-19 चा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर परिस्थिती सुधारल्यावर ज्या विद्यार्थ्यांना आपल्याला गुण कमी मिळाले आहेत असे वाटते त्यांना परीक्षेची संधी देण्यात येईल.

मागील सर्व सत्रात उत्तीर्ण झालेल्या ज्या अंतिम सत्रातील/वर्षातील विद्यार्थ्यांना परीक्षा न देता पदवी प्रमाणपत्र हवे असल्यास तसे त्यांच्याकडून लेखी स्वरुपात घेऊन विद्यापीठांनी योग्य ते सूत्र वापरुन त्यांचा निकाल घोषित करावा. आणि मागील सर्व सत्रात उत्तीर्ण झालेल्या अंतिम सत्रातील/वर्षातील ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा द्यायची इच्छा असेल तसे त्यांच्याकडून लेखी स्वरुपात घेऊन त्यांना परीक्षेस बसण्याची संधी देण्यात यावी. अशा विद्यार्थ्यांच्या परीक्षा कोणत्या महिन्यात घेता येऊ शकतील. याची कोविड-19 चा स्थानिक पातळीवरील प्रादुर्भाव व स्थानिक परिस्थिती विचारात घेऊन, तसेच संबंधित जिल्हाधिकारी तथा आपत्ती निवारण प्राधिकरण यांचेशी विचारविनिमय करुन विद्यापीठांनी निर्णय घ्यावा व त्यानुसार वेळापत्रक जाहीर करावे.आशा सूचना सुद्धा विद्यापीठांना देण्यात आल्या आहेत असेही धरणगाव युवा सेना व भारतीय विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी यांनी निवेदनात म्हटले आहे.

परीक्षा घ्यायच्या म्हणाल्या तर अनेक शाळा, महाविद्यालये, वसतिगृहे आज विलगीकरण केंद्रे म्हणून उपयोगात येत आहेत. गावी परत गेलेल्या विद्यार्थ्यांना परत वसतिगृहात परत येणे वाहतुकीच्या व्यवस्थेअभावी अवघड आहे. शिवाय त्यांची सर्व पुस्तके, संगणक साहित्य त्यांच्या वसतिगृहात अडकले आहेत.नुकतेच बंगळूरू येथे परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.तरी अंतिम वर्षांच्या परीक्षा केंद्रीय गृहमंत्रालयाने दि ६जुलै२०२०निर्णय तात्काळ मागे घेऊन विद्यार्थ्यांचा हिताचा निर्णय घ्यावा असे निवेदनात म्हटले आहे.

यावेळी उपस्थित युवासेना उपजिल्हा प्रमुख योगेश वाघ, विद्यार्थीसेना तालुका प्रमुख विशाल महाजन, शहर प्रमुख पराग चव्हाण, उपनगराध्यक्ष विलास महाजन, शिवसेना उपतालुका प्रमुख राजेंद्र ठाकरे, नगरसेवक जितेंद्र धनगर, किशोर चौधरी, राहुल रोकडे, अरविद चौधरी,गोपाल चौधरी, नरेंद्र महाजन, राहुल महाजन, विशाल चौधरी, बिट्टू ठाकरे, आकाश चौधरी, दिपक चौधरी, विनोद रोकडे उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.