यवतमाळ जिल्ह्यात भीषण अपघात, ५ भाविक जागीच ठार

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

पोहरा देवीला नवस फेडायला जाणाऱ्या भाविकांवर काळाने घाला घातला. या भीषण अपघातात पाच भाविक जागीच ठार झाले तर ११ जण गंभीर जखमी झाले आहे. पुसद-दिग्रस मार्गावर हा भीषण अपघात झाला. बेलगव्हान घाटात नाल्याच्या पुलावरून अ‍ॅपे रिक्षा थेट खाली कोसळली. वाहनावरील नियंत्रण हुकल्याने हा भीषण अपघात झाला. हा अपघात दुपारी १२ वाहत झाला. ११ जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यातील पाच जणांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. जखमींमध्ये दोन ते तीन लहान मुलांचाही समावेश आहे.

नवस फेडायचं राहिलाच…
पुसद तालुक्यातील मोह तांडा, गोकी तांडा आणि पांढुर्ना गावातील भाविक पोहरादेवी येथे नवस फेडण्यासाठी जात होते. त्यांनी सकाळीच सामानाची आवरासावर केली. नवस फेडण्यासाठीचे साहित्य घेतले. वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे हे सर्व जण नवस फेडण्यासाठी जात होते. पण बेलगव्हान घाटातच काळाने त्यांच्यावर झडप घातली. वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा भीषण अपघात झाला.

पुसद ग्रामीण रुग्णालयात उपचार
मोहा तांडा, गोकी तांडा आणि पांढुर्ना गावातील भाविक पोहरादेवी येथे नवस फेडण्यासाठी जात होते. बेलगव्हान घाटात वाहनचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. ऑटो पुलावरून थेट खाली कोसळला या अ‍ॅपे रिक्षामध्ये १५-२० जण असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. त्यांना बाहेर पडायला वेळच मिळाला नाही. त्यांच्यावर पुसद ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरु आहे. पोलीस मृतांची आणि जखमींची ओळख पटवत आहेत. घटनेतील जखमींची विचारपूस करण्यासाठी आणि मदतीसाठी आमदार इंद्रनील नाईक आणि आमदार निलय नाईक यांनी मेडिकेअर रुग्णालयात धाव घेतली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.