आयसीसीची मोठी घोषणा; अंतिम सामन्याची तारीख व ठिकाण जाहीर

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

टीम इंडिया (India) विरुद्ध ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यातील कसोटी मालिकेला अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. नागपुरात (Nagpur) होणाऱ्या पहिल्या कसोटीसाठी 40 हजारांपेक्षा अधिक तिकीटांची विक्री झाली आहे. टीम इंडियाच्या खेळाडूंसह, क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. या दरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदने अर्थात आयसीसीने मोठी घोषणा केली आहे. आयसीसीने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या (ICC World Test Championship) अंतिम सामन्याची तारीख आणि ठिकाण जाहीर केलं आहे. आयसीसीने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.

क्रिकेट विश्वात गेल्या अनेक दिवसांपासून जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्याच्या तारखेबाबत एकच चर्चा सुरु होती. अखेर आता आयसीसीने (ICC) तारीख जाहीर केली आहे. तसेच या महत्त्वाच्या सामन्यासाठी आयसीसीने राखीव दिवसही ठेवला आहे. त्यामुळे आता तारखांच्या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळालं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.