भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या महिलेचा विनयभंग ; चौघांविरुद्ध गुन्हा

0

जळगाव : दीराला मारहाण होत असल्याने भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या महिलेच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करीत महिलेचा विनयभंग केल्याची घटना शहरातील एका परिसरात घडली. याप्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील एका परिसरात विवाहिता वास्तव्यास असून त्यांचे शेजारी राहणाऱ्यांसोबत भांडण झाले. दरम्यान, विवाहिता त्यांच्या कुटुंबियांसह भांडण सोडविण्यासाठी गेल्या. मात्र त्यांच्यासह त्यांना देखील मारहाण करण्यात आली. तसेच धुणे धुण्याचा दगड मारण्यासाठी उचलला. विवाहितेचा दीर हे घरात असतांना त्यांना मारहाण करण्यासाठी काही जण त्यांच्या घरात शिरले. यावेळी विवाहिता या दरवाजात उभ्या असतांना काही जणांनी विवाहितेच्या मनाला लज्जा

उत्पन्न होईल असे कृत्य केले. तसेच मारहाणीत विवाहितेच्या गळ्यातील १० ग्रॅम वजनाची सोन्याची चैन कुठेतरी गहाळ झाली. याप्रकरणी विवाहितेने दिलेल्या तक्रारीवरुन राजेश धर्मा पाटील, सचिन धर्मा पाटील, विनायक किशोर पाटील, सचिन पाटील, युवराज उर्फ गट्या यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.