वावडदा येथे म्हैस आल्याच्या कारणावरून शेतकऱ्याला ५ जणांकडून मारहाण

0

जळगाव ;- शेताच्या बांधावर म्हैस आल्याच्या कारणावरून एका तरुण शेतकऱ्याला ५ जणांनी मारहाण करून जीवेठार मारण्याची धमकी दिल्याची घटना तालुक्यातील वावडदा गावात असलेल्या गोपाळवाडा परिसरात घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

जळगाव तालुक्यातील वावडदा येथे योगेश तुळशीदास गोपाळ (वय-३०) हा तरूण राहत असून त्याला बुधवारी ५ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता योगेशच्या शेताच्या बांधावर म्हैस आल्याच्या कारणावरून जाब विचारला. असता या रागातून गोरख आप्पा गोपाळ, प्रकाश आप्पा गोपाळ, चेतन बापू गोपाळ, आप्पा ओंकार गोपाळ आणि ताराबाई आप्पा गोपाळ सर्व रा. वावडदा, ता. जि. जळगाव यांनी लाठ्याकाठ्या घेऊन योगेश गोपाळ व त्याच्या नातेवाईकांना शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच जीवे ठार मारण्याची धमकी दिली. या घटनेनंतर योगेश गोपाळ याने रात्री ९ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार एमआयडीसी पोलीस ठाण्यात गोरख आप्पा गोपाळ, प्रकाश आप्पा गोपाळ, चेतन बापू गोपाळ, आप्पा ओंकार गोपाळ आणि ताराबाई आप्पा गोपाळ सर्व रा. वावडदा, ता. जि. जळगाव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक प्रदीप पाटील करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.