वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
वरणगाव भुसावळ तालुक्यातील आचेगाव जवळ एका वीस वर्षीय तरुणाला रेल्वे गाडीचा जोरादार धक्का लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. मयत तरुण हा बोदवड तालुक्यातील साळसिगी येथील आनंद भावलाल भिल (वय २०) असून त्याचा आचेगाव जवळील रेल्वे खांबा न १३ / ४६३ दरम्यान रेल्वे गाडीचा फटका लागल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली असून, या बाबत वरणगाव पोलीस स्टेशनला गॅगमन रमेश विठ्ठल पाटील यांच्या सांगण्यानुसार नुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून घटनेचा तपास पो.हे. कॉ प्रमोद कणखरे हे करीत आहे.