Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • कृउबा सभापतीपदी लक्ष्मण पाटील यांची बिनविरोध निवड
    • विधान परिषदेच्या 17 जागांचा बिगुल वाजला!
    • एक दिवसाच्या उपचारासाठी उकळले ३ लाखांचे बील
    • शिवराज मोटेगांवकरांना सीबीआयकडून अटक
    • व्ही. डी. सतीशन यांनी घेतली केरळच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ
    • पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरलाच पाहिजे; अन्यथा भविष्यात संघर्ष अटळ!
    • रावेरला 18 दिव्यांग जोडप्यांचा सामूहिक विवाह उत्साहात
    • नीट पेपरफुटी प्रकरणामागे सर्व भाजपचेच नेते
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»जळगाव जिल्हा»आदिवासी जनआक्रोश मोर्चात सहभागी व्हा : एम. बी. तडवी सर
    जळगाव जिल्हा

    आदिवासी जनआक्रोश मोर्चात सहभागी व्हा : एम. बी. तडवी सर

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveOctober 15, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क

    आदिवासी समुदायाच्या विविध मागण्यांसाठी १८ ऑक्टोबर रोजी जनआक्रोश मोर्चा काढण्यात येत असून यात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आदिवासी तडवी भिल्ल एकता मंचचे संस्थापक अध्यक्ष एम. बी. तडवी यांनी केले आहे.

    धनगर समाजाला आदिवासी एस. टी. अनुसुचित जमातीच्या आरक्षण न देणे व जळगाव जिल्ह्यातील बोगस आदिवासींचे एसटी अनुसुचित जमातीचे दिलेले दाखले रद्द करण्यात यावे अशा विविध मागण्यासाठी दिनांक १८ ऑक्टोबर बुधवार रोजी फैजपुर येथील प्रांत अधिकारी कार्यावर आदिवासी तडवी भिल्ल एकता मंचच्या वतीने भव्य आदिवासी जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. आपल्या न्याय हक्काच्या संघर्षासाठी या मोर्चात चोपडा, रावेर, यावल सह जिल्ह्यातील आदिवासी बांधवांनी मोठया संख्येत सहभागी व्हावे असे आवाहन आदिवासी तडवी भिल्ल एकता मंचचे संस्थापक अध्यक्ष एम. बी. तडवी यांनी केले आहे.

    याबाबत आदिवासी तडवी भिल्ल एकता मंच महाराष्ट्रच्या वतीने काढण्यात आलेल्या आवाहन पत्रकात संघटनेने आपल्या प्रमुख मागण्यांमध्ये म्हटले आहे की, धनगर समाजाला एसटी चे आरक्षण देण्यात येवु नये. जळगाव जिल्ह्यातील बोगस आदिवासी एसटी जातीचे दिलेले दाखले रद्द करण्यात यावेत. रावेर, यावल, चोपडा तालुक्यातील कायम रहिवासी करीत असलेल्यासाठी आदिवासींचे ग्रामपंचायत दप्तरी नमुना क्रमांक ८ ला नांवे दाखल करण्यात यावीत, पेसा कायदा अधिक सक्त करण्यात यावा. फैजपुर येथे एक हजार विद्यार्थी व विद्यार्थीनीसाठी आदिवासी वस्तीगृह सुरू करण्यात यावे.

    याशिवाय तिडया, अंधारमंळी मोहमांडली या अतिदुर्गम क्षेत्रात रस्ते तयार करण्यात यावेत अशा विविध ज्वलंत प्रश्नांना घेवुन आदिवासी तडवी भिल्ल एक्तता मंचच्या वतीने दिनांक १८ ऑक्टोबर बुधवार रोजी सकाळी ९ वाजेपासुन फैजपुर साखर कारखाना ते फैजपुर प्रांत आधिकारी कार्यालया पर्यंत हा पायी मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात आदिवासी बांधवांनी हजारोंच्या संख्येत उपस्थित राहावे असे आवाहन संघटनेचे राज्यअध्यक्ष एम. बी. तडवी व सर्व पदाधिकारी यांनी केले आहे.

    Tribal Yaval
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरलाच पाहिजे; अन्यथा भविष्यात संघर्ष अटळ!

    May 18, 2026

    रावेरला 18 दिव्यांग जोडप्यांचा सामूहिक विवाह उत्साहात

    May 18, 2026

    अंधाराचा फायदा घेत सोन्याची पोत लांबवली

    May 17, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif