Tokyo Olympics 2020 : मीराबाई चानूने रचला इतिहास; भारताला मिळवून दिले रौप्यपदक

0

टोकियो ऑलिम्पिकच्या  पहिल्याच दिवशी भारताने पदकांच्या यादीमध्ये आपले खाते उघडले आहे. मीराबाई चानूने वेटलिफ्टिंगमध्ये महिलांच्या 49 kg किलो गटात रौप्य पदक जिंकून इतिहास रचला आहे. ऑलिम्पिक स्पर्धेच्या इतिहासातील हे भारताचे पाचवे रौप्यपदक आहे. ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी पदक जिंकणारी मीराबाई चानू ही दुसरी महिला वेटलिफ्टर आहे, तर चीनच्या जिजीहूने टोकियो ऑलिम्पिकमधील 49 किलो वजनी उचल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे.

2008 नंतर पहिल्याच दिवशीऑलिम्पिकमध्ये भारताला पहिल्यांदाच एखादे पदक मिळाले आहे. 2008 मध्ये पहिल्याच दिवशी अभिनव बिंद्रा यांनी शूटिंग मध्ये गोल्ड मेडल मिळवलं होत. वेटलिफ्टिंगमध्ये रौप्य पदक जिंकणारी मीरबाई ही पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे. स्नॅचनंतर मीराबाई चानू दुसर्‍या क्रमांकावर होत्या. यानंतर मीराबाई चानूने पहिल्या प्रयत्नात 110 किलो वजन उचलले. दुसर्‍या प्रयत्नात मीराबाई चानू 115 किलो वजन उचलण्यात यशस्वी ठरल्या. तथापि, तिसऱ्या प्रयत्नात त्या अपयशी ठरल्या आणि तिला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

मीराबाई चानूने पदक जिंकताच संपूर्ण देशात आनंद साजरा केला जात आहे. तिच्या या यशाने संपूर्ण देशाला अभिमान वाटत आहे. मीराबाई चानू यांच्या कर्तृत्वाबद्दल आनंद व्यक्त करीत अध्यक्ष रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांचे अभिनंदन केले आहे. “ही अनेक आनंदी सुरवात असून, मीराबाईचे मी अभिनंदन करतो तिचा हा विजय संपूर्ण देशाला प्रेरणा देणारा आहे.” अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मीराबाई यांचे अभिनंदन केले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.