येत्या १ जूनपासून वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत T20 विश्वचषक स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. या वर्ल्डकप साठी भारतीय संघ कधी जाहीर होणार याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष्य लागलं आहे. आयसीसीच्या नियमानुसार सर्व संघांना आपापल्या टीमची घोषणा 1 मेपर्यंत करायची आहे. त्यानुसार भारतीय निवेदन समिती सुद्धा लवकरच आपला संघ जाहीर करेल. मीडिया रिपोर्ट नुसार, येत्या 27 आणि 28 एप्रिलला याबाबत बैठक होऊन अधिकृत घोषणा केली जाईल.
27 एप्रिलला दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना होणार आहे. या सामन्यासाठी भारताचा कर्णधार रोहित शर्मा दिल्लीत असेल. त्यामुळं हीच वेळ साधून निवड समितीचे सर्व सदस्य आणि प्रशिक्षक रोहित शर्मासोबत संघ निवडीबाबत चर्चा करतील. कोणकोणत्या खेळाडूचा संघात समावेश करण्यात यावा यावर विचार विनिमय होईल आणि मग वर्ल्डकपच्या अंतिम संघावर शिक्कामोर्तब होईल. निवड समितीचे प्रमुख अजित आगरकर सध्या स्पेनमध्ये आहे.