चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
चाळीसगाव तालुक्यातील लोणजे येथे दोघांच्या त्रासाला कंटाळून १४ वर्षीय अल्पवयीन मुलीने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना १८ जुलै रोजी घडली. याप्रकरणी दोन संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अश्विनी राजू चव्हाण (वय १४) असे बालिकेचे नाव आहे. अनुसयाबाई राठोड यांनी पोलिसांत फिर्याद दिली. त्यांच्या दोन्ही मुली १७ रोजी दुपारी शेतातून घरी येत होत्या. गावातील दिलीप सोनार आणि वासुदेव चव्हाण (रा. पाथरजे) यांनी या मुलींना तुमचे लग्न होवू देणार नाही असे सांगितले. त्यांच्या त्रासाला कंटाळून अश्विनी चव्हाण या बालिकेने १८ रोजी दुपारी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
याप्रकरणी सोनार व चव्हाण यांच्याविरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात कलम ३०५, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल झाला. घटनेनंतर दोन्ही संशयित पसार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. लवकरच ते जेरबंद होतील, अशी माहिती तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक लोकेश पवार यांनी दिली.