कैरो: – शनिवारी शहरात झालेल्या हवाई हल्ल्यात 22 जण ठार झाले. आरोग्य अधिकार्यांनी हा आतापर्यंतचा सर्वात घातक हवाई हल्ला असल्याचे म्हटले आहे.
आरोग्य मंत्रालयाच्या निवेदनानुसार राजधानी खार्तूमच्या शेजारील ओमदुरमन येथील निवासी भागात हा हवाई हल्ला झाला. ज्यामध्ये अनेक जण जखमी झाल्याची माहिती आहे.
हवाई हल्ला हा राजधानीच्या शहरी भागात आणि सुदानच्या इतर भागात सैन्य आणि निमलष्करी रॅपिड सपोर्ट फोर्स (RSF) यांच्यातील प्राणघातक चकमकींपैकी एक आहे. गेल्या महिन्यात खार्तूममध्ये झालेल्या हवाई हल्ल्यात पाच मुलांसह किमान १७ जणांचा मृत्यू झाला होता.
स्थानिक रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, आरएसएफने ओमदुरमनच्या निवासी भागावर हवाई हल्ल्यांसाठी लष्कराला दोष दिला. लष्कराने तेथील निमलष्करी दलासाठी महत्त्वाची पुरवठा लाईन तोडण्याचा प्रयत्न केल्याची माहिती आहे.
त्याचवेळी आणखी दोन रहिवाशांचे म्हणणे आहे की, या हल्ल्याला कोणती बाजू जबाबदार आहे? हे निश्चित करणे फार कठीण आहे. ते म्हणाले की, लष्कराच्या विमानांनी या भागातील आरएसएफच्या जवानांना वारंवार लक्ष्य केले आणि निमलष्करी दलांनी लष्कराच्या विरोधात ड्रोन आणि विमानविरोधी शस्त्रे वापरली.