डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुकीत विजेचा शॉक लागून दोन तरुणांचा मृत्यू

0

 

मुंबई , लोकशाही न्यूज नेटवर्क

डॉ.  बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती देशभरात उत्साहात साजरी होत असलेल्या डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त सर्वत्र जल्लोष सुरू आहे. महाराष्ट्रातही  जयंतीचा उत्साह पाहायला मिळत असून आंबेडकरी जनतेकडून विविध कार्यक्रम व मिरवणुका काढल्या जात आहेत. एकीकडे भीमसैनिकांमध्ये मोठा उत्साह असतानाच विरारमध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे.

आंबेडकर जयंती मिरवणुकीत विजेचा शॉक लागून दोन तरुणांचा मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत.ही घटना गुरुवारी रात्री विरारमधील कारगिल नगर परिसरात घडली. रुपेश सुर्वे (वय-30) आणि सुमित सुत (वय-23) अशी मृतांची नावे आहेत. आमडेकर जयंतीच्या पूर्वसंध्येला घडलेल्या या घटनेमुळे सर्वत्र शोककळा पसरली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, विरारच्या कलगील नगर येथील बुद्धजन पंचायत समितीतर्फे आंबेडकर जयंतीनिमित्त मिरवणूक काढण्यात आली.

रात्री 9.00 वाजता सुरू झालेली मिरवणूक रात्री 10.30 वाजता संपली. मिरवणूक संपवून भीमसैनिक घरी परतत होते. त्यावेळी मिरवणुकीच्या ट्रॉलीवर सहा जण उभे होते. दरम्यान, ट्रॉलीवरील लोखंडी रॉड जवळच असलेल्या रोहित्रावर आदळल्याने धडक बसल्याने सहा जण दूर फेकले गेले. यामध्ये रुपेश आणि सुमित यांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य चार जण गंभीर जखमी झाले.

Leave A Reply

Your email address will not be published.