जामनेर ;– शेतकऱ्याच्या मालकीच्या शेतीसाठी लागणारे साहित्य असा एकुण ३२ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना जामनेर तालुक्यातील शेरी शिवारात घडली आहे. आहे. याबाबत पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, जामनेर तालुक्यातील शेरी येथे शेतकरी पोपट भिका पाटील (वय-६५) यांच्या खळ्यातून ९ एप्रिल रात्री ११ ते १० एप्रिल सकाळी ७ वाजेच्या दरम्यान, साहित्य व अवजारे असा एकुण ३२ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. १२ एप्रिल रोजी पहूर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिल्यावरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार रविंद्र देशमुख करीत आहे.