सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

0

जळगाव ;- तालुक्यातील मन्यारखेडा येथील एका २३ वर्षीय विवाहितेला मुलबाळ होत नसल्याने तिचा सासरच्या मंडळींकडून त्रास होऊ लागल्याने या त्रासाला कंटाळून तिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कदायक प्रकार ६ जुलै रोजी सायंकाळी उघडकीस आला असून याप्रकरणी नशिराबाद पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

ममता शंकर भील (वय-२३) रा. मन्यारखेडा ता.जि.जळगाव असे मयत विवाहितेचे नाव आहे. भुसावळ तालुक्यातील जुगलखोरी येथील माहेर असलेल्या ममता शंकर भील यांच्या विवाह जळगाव तालुक्यातील मन्यारखेडा येथील शंकर सुरेश भील यांच्याशी तीन वर्षांपुर्वी झालेला आहे. सासरी पती, सासरे, सासू आणि नणंद यांच्यासोबत राहत होती. . गुरूवार ६ जुलै रोजी घरी कुणीही नसतांना राहत्या घरात विवाहितेने गळफास घेवून आत्महत्या केली. नशिराबाद पोलीस ठाण्याचे प्रभारी सपोनि राजेंद्र साळुंखे यांच्यासह पथकाने घटनास्थळीपंचनामा करून मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला. . दरम्यान, विवाहितेला मुलबाळ होत नाही म्हणून तिचा गेल्या तीन वर्षांपासून छळ सुरू होता. तसेच त्यांनी हे कृत्य केल्याचा आरोप मयत विवाहितेचे वडील अर्जून एकनाथ भिल यांच्यासह नातेवाईकांनी केला आहे. पतीसह सासरच्या मंडळीविरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी अशी मागणी केली आहे. या घटनेबाबत नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.