संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान रखडले, लाभार्थ्यांवर उपासमारीची वेळ

0

मनवेल ता. यावल, लोकशाही न्युज नेटवर्क 

इंदिरा गांधी व संजय गांधी निराधार योजना अंतर्गत विधवा, अंपग वयोवृध्द नागरीकांना जुलै महिन्यापासून अनुदान मिळाले नसल्यामुळे वृद्ध नागरीकांचे हाल होत आहे. शासनाकडून गोरगरीबांच्या खात्यावर तात्काळ अनुदान जमा होत असुन तात्काळ वाटप करण्यासाठी जिल्हाधिकारी नियोजन करुन लाभार्थाना अडचण होणार नाही म्हणून  प्रयन्त करीत असून पोस्ट खात्या मार्फत पेन्शन आपल्या दारी उपक्रमाचा माध्यमातून घरपोच अनुदान प्राप्त होत आहे.

संजय गांधी निराधार योजनाअंर्तगत लाभार्थाना  देण्यात येणारे अनुदान मागील दोन महिन्यांपासून मिळाले नाही. त्यामुळे निराधार नागरिक व त्यांचे कुटुंबिय आर्थिक अडचणीत आले आहे. अनुदान तत्काळ खात्यांमध्ये जमा करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

निराधार नागरिकांचे जगणे सुसह्य व्हावे, यासाठी शासनाकडून निराधार नागरिकांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातात. निराधार व्यक्ती पूर्णपणे दुसऱ्यांच्या भरवशावर जगत असल्याने योजनांचा लाभ देण्याबरोबरच त्यांना आर्थिक मदतही करणे आवश्यक आहे. जेणे करून त्या पैशांचा उपयोग औषधी खरेदी करण्याबरोबरच दैनंदिन गरजांवर करता येते.

निराधारांना अनुदान देण्यासाठी संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन योजना चालविल्या जातात. या योजनेंतर्गतच्या लाभार्थ्याला सप्टेंबर  महिन्यांपासुन एक हजार रूपये मासिक अनुदान दिले जात आहे. मात्र मागील तीन महिन्यांपासून मानधनच मिळाले नाही जुलै महिन्यानंतर मानधन मिळाले नाही. मानधनाची रक्कम सरळ बँक खात्यात जमा होत असल्याने निराधार नागरिक सर्व प्रथम बँकेमध्ये जाऊन अनुदानाविषयी विचारणा करीत आहेत. मात्र अनुदानच जमा न झाल्याचे बँकेकडून सांगण्यात येत आहे. काही नागरिक तहसील कार्यालयातही विचारणा करीत आहेत. शासनाकडून अनुदान न मिळाल्याने बँकेमध्ये जमा करण्यात आले नसल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे. सतत तीन महिन्यांपासून मानधन न मिळाल्याने निराधार नागरिक व त्यांच्या कुटुंबिय आर्थिक अडचणीत आले आहेत. तत्काळ मानधन देण्यात यावे, अशी मागणी होत आहे. काही लाभार्थाना जुलै व ऑगस्ट या दोन महिन्यांचे अनुदान अद्यापही मिळाले नाही. लाभार्थी दररोज बँकेत चकरा मारात आहे. अनुदान जमा होण्याचा आशेने पासबुक प्रीट मारुन बँलेज चेक करीत असतात.

शिंदे सरकारने फेब्रुवारी महिन्यात अर्थसंकल्पमध्ये संजय गांधी निराधार योजना अंतर्गत इंदिरा गांधी वृध्दपकाळ योजना, श्रावणबाळ निवृत्त योजनेत पाचशे रुपयांची वाढ केल्याची घोषणा केली होती.  या घोषणेची अंबलबजावणी जुलै महिन्यापासून होत असल्याने लाभार्थ्यांना आता दरमहा एक हजार पाचशे रुपये मिळणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.