मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
माजी मंत्री रामदास कदम यांनी आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray यांनाच शंभर खोके घ्यायची सवय असल्याचा आरोप कदम (Ramdas Kadam) यांनी केला आहे.
आज दापोली येथे शिंदे गटाची जाहीर सभा आयोजित केली आहे. या सभेत आदित्य ठाकरेंच्या शंभर खोक्यांची पोलोखोल करणार असल्याचे रामदास कदम यांनी सांगितले.
शिंदे गट आणि शिवसेना यांच्यात संघर्ष सुरूच असून दोन्हीकडचे नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. त्यामुळं राजकीय वातावरण तापलं आहे. त्यातच आता शिंदे गटातील नेते रामदास कदम यांनी थेट युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
शंभर खोके घ्यायची सवय कोणाला आहे, याची पोलखोल आजच्या दापोली येथील शिवसेनेच्या जाहीर सभेत करणार असल्याची माहिती रामदास कदम यांनी दिली आहे. यावेळी रामदास कदम यांनी शिवसेना नेते भास्कर जाधव यांचा ‘चिपळूणचा नाच्या’ असा उल्लेख करत त्यांच्यावरही जोरदार टीका केली.