मुंबई-गोवा मार्गावरील परशुराम घाटातील वाहतूक ‘या’ काळात राहील बंद

0

लोकशाही, न्यूज नेटवर्क

 

मुंबई-गोवा (Mumbai-Goa) मार्गावरील परशुराम घाटातील (Parashuram Ghat) सर्व वाहतूक येत्या २५ एप्रिलपासून १० मे पर्यत ठराविक वेळेत वाहतूकीसाठी बंद राहणार असल्याचे प्रशासनाने कळविले आहे. या कालावधीत घाटातील सर्व सर्वप्रकारची वाहतूक दुपारी १२ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत पूर्णत: बंद राहणार आहे. पावसाळ्यापूर्वी ह्या घाटातील सर्व काम पूर्ण व्हावे यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. ठेकेदार कंपनीने प्रशासनाला घाटातील वाहतूक काही दिवस दिवसा बंद ठेवण्याची परवानगी लेखी पत्राद्वारे मागितली हाेती. त्यास प्रशासनाने संमती दिली आहे.

दुपारी १२ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत घाटातील सर्वप्रकारची वाहतूक पूर्णपणे बंद राहील.या कालावधीत महामार्गावरील हलक्या वाहनांची वाहतूक ही पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार आहे. या वेळेत हलकी वाहतूक पर्यायी मार्गाने लोटे – चिरणी- आंबडस – कळबस्ते- चिपळूण या मार्गाने सुरु राहिल. प्रवाशांनी परशूराम घाटातील वाहतुकीच्या बदलाची नाेेंद घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.