दीड एकर उसाचे रानडुकरांनी केले नुकसान

0

नशिराबाद : – येथील भवानी नगर परिसरात असलेल्या शेत शिवार परिसरात रानडुकराने थैमान घातला आहे. रानडुकराने नशिराबाद परिसरातील सोपान वाणी या शेतकऱ्याचे तब्बल एक ते दीड एकर वरील उसाचे नुकसान केल आहे.

कृषी विभागाने पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांने केली आहे. पिकांचं नुकसान करणाऱ्या रानडुकराचा वनविभागाने बंदोबस्त करावा अशीही मागणी नशिराबाद परिसरातील शेतकऱ्यांमधून केली जात आहे. तर भवानीनगर परिसरामधील घरांचे पाणी हे त्यांच्या शेतात शिरत असल्याने पिकांची वाढ खुंटली असून दुर्गंधी संपूर्ण शेतात पसरत आहे यामुळे नगरपरिषदेने या सांडपाण्याची व्यवस्था करावी व वनविभागाने रानडुकरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकरी सोपान वाणी यांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.