नाशिक-मुंबई महामार्गावर दुचाकीचा भीषण अपघात, २ जण जागीच ठार

0

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क

नाशिक-मुंबई महामागार्वर इगतपुरीजवळ दुचाकीच्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला. बॅरिकेट्स तोडून दुचाकी थेट समोरील ट्रॅकवर आदळल्याने हा अपघात झाला. यात दोघांचा जीव गेला. या अपघातात मोटार सायकलवरील वैतरणा येथील समाधान देवराम भगत, सचिन कचरू पथवे हे दोघे जण जागीच ठार झाले. खंबाळे येथील भाऊ भगत हे जखमी झाले आहेत. ट्रिपलसीट असलेल्या मोटारसायकलस्वाराचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. दुचाकी थेट रस्त्यावरील बॅरिकेट्स तोडून समोरील ट्रकवर जाऊन आदळली. अपघात इतका भीषण होता की दुचाकीच्या चिंधड्या झाल्या.

अपघाताची माहिती मिळताच रुट पेट्रोलिंग टीमच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी टोलच्या रुग्णवाहिकेद्वारे दाखल होत जखमींना पुढील उपचारासाठी इगतपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. इगतपुरी पोलिसांकडून पुढील तपास सुरु आहे. इगतपुरीजवळ साई कुटिरजवळ मोटारसायकलस्वाराचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. या घटनेत मोटारसायकल बॅरिकेट्स तोडून पुढे चालणाऱ्या ट्रकवर पाठीमागून जाऊन जोरदार आदळली.

महामार्गावर सातत्याने अपघात
मुंबई-नाशिक मार्गावर सातत्याने अपघात घडत असतात. कधी चारचाकी वाहनांचे अपघात, तर कधी दुचाकी तर कधी मोठे-मोठे ट्रेलर या मार्गावरून जात असल्याने वाहतूक कोंडी होऊन अपघाताची घडत असते. तसेच या मार्गावर खड्डेही मोठ्या प्रमाणात असलेल्या अनेक ठिकाणी खड्डे बुजविण्याचे काम सुरु आहे. यासाठी काही ठिकाणी वाहनांना माहतीसाठी बॅरिकेट्स लावण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.