मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
मुंबईत याआधी अनेकदा धार्मिक घोषणाबाजी कारण्यावरुन हिंसेच्या घटना घडल्या आहेत. मात्र, महाराष्ट्रातच अशी घटना घडली नव्हती. मात्र मुंबईत एका दलित तरुणाला धार्मिक घोषणा देण्यास भाग पाडत मारहाण केल्याचं समोर आलं आहे. कांदिवलीत एका दलित तरुणाची वाट अडवून त्याला ‘जय श्री राम’ बोलण्यास भाग पाडत सहा तरुणांनी मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. २५ सप्टेंबरला रात्री तक्रारदार हे कांदिवलीतून रात्री उशिरा घरी येत असतांना गोकुळ नगर येथे या टोळक्यांनी तक्रारदाराची वाट अडवली होती.
त्यानंतर या टोळीने तक्रारदारावर जय श्री राम बोलण्यासाठी दबाव टाकला. तक्रारदार जय श्री राम बोलत नाही म्हणून त्याला हिनवत मारहाण केली. वेळीच तक्रारदारांचा भाऊ घटनास्थळी पोहोचला. त्याने मारहाण झालेल्या तरुणाला उपचाराकरिता जवळच्या रुग्णालयात दाखल केले. तक्रारदारांनी नोंदवलेल्या तक्रारीनंतर कांदिवली पोलिसांनी चौघांविरोधात कलम ३२३, ३४१, ५०४, ५०६, ३४ भादवी अंतर्गत गुन्हा दाखल केला.