अंधेरी सबवेवर साचले पाणी, वाहतुकीसाठी बंद

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

हवामान खात्याकडून मुंबईला ऑरेंज अलर्ट जाहीर केल्यांनतर आज सकाळपासूनच मुसळधार पाऊस सुरु आहे. मागील एका तासापासून मुंबईत कोसळधार पाऊस होत असून यामुळे मुंबईतील अनेक सखल भागात पाणी पोहचण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे नागरिकांना आणि वाहन चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा सध्याचा एकमेव मार्ग म्हणजे अंधेरी सबवे. हा देखील पाण्याने पूर्णपणे भरलेला असून साधारणपणे चार ते पाच फूट इतके पाणी साचल्यामुळे वाहतूक पोलिसांनी ये-जा करण्यासाठी वाहनचालक आणि नागरिकांना बंदी केली आहे.

त्यामुळे आता अंधेरी पूर्वेकडे जाण्यासाठी वाहन चालकांना कॅप्टन गोरे पूल आणि ठाकरे उड्डाणपुलाच्या वापर करण्याच्या सूचना वाहतूक पोलिसांनी केल्या आहेत. मुंबईसह- उपनगरात जोरदार पाऊस सुरु आहे. सखल भागात पाणी साचलं आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. गरज असेल तरच घराबाहेर पडा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.