मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क
मुक्ताईनगर तालुक्यातील उचंदे शेती शिवारात वीज पडल्याने एक तरुण ठार तर दोन तरुण जखमी झाल्याची घटना मंगळवारी दुपारी पावणे तीनच्या सुमारास घडली.
उचंदे शिवारात माणिक जगन्नाथ पाटील यांच्या शेतात काम सुरू असताना विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस आल्याने मुकेश अशोक पाटील (वय ३३ ) , गणेश माणिक पाटील (वय ३४) आणि शत्रुघन काशीनाथ धनगर (वय ३५) हे तिघे जवळच्या निंबाच्या झाडाखाली उभे राहिले आणि या झाडावर वीज कोसळली.
यात शत्रुघन धनगर यांच्या अंगावर वीज पडल्याने ते ठार झाले तर मुकेश पाटील आणि गणेश पाटील हे जखमी झाले आहेत. दोघांवर मुक्ताईनगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.
या दुर्दैवी घटनेने उचंदा येथे शोककळा पसरली आहे. तिघे तरुण शेतकरी कुटुंबातील आहेत.