महाराष्ट्रातून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु, वाचा सविस्तर

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

मान्सूनची आता परतीच्या प्रवासाला सुरवात झाली आहे. मुंबई, पुणे आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात देखील मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे. मुंबई आणि पुण्यातून मोसमी वारे माघारी फिरले असून महाराष्ट्रातून मान्सूनचा परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे. अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.

राज्याच्या बहुतांश भागात पावसाने माघार घेतली आहे. काही भागांमध्ये हलक्या सारी कोसळत आहे. दरवर्षी जूनच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात येणारा येणारा मान्सून यंदा 25 जूनला दाखल झाला. गेल्या वर्षी मुंबईतून 23 आॅक्टोबर रोजी राज्यातून मान्सून माघारी परतला होता. मान्सून राज्यातून माघारी परतण्यात सुरूवात झाली असली तरी, राज्यात काही ठिकाणी हवा तसा पाऊस न झाल्याने चिंताजनक परिस्थिती समोर येत आहे. राज्यातील नऊ जिल्ह्यांमध्ये पावसाची मोठी तूट कायम आहे.

पुढील दोन-तीन दिवसांत मान्सून माघार घेणार
नैऋत्य मान्सूनने 3 ऑक्टोबर 2023 रोजी उत्तर भारतातील बहुतांश भागांतून माघार घेतली आहे. उत्तराखंड, पश्चिम उत्तर प्रदेश, पश्चिम मध्य प्रदेश, राजस्थान आणि गुजरातमधील उर्वरित भागांमधूनही मान्सूनने माघार घेतली आहे. जम्मू-काश्मीर प्रदेश, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पश्चिम उत्तर प्रदेश, पश्चिम मध्य प्रदेश, उर्वरित गुजरात, पूर्व उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशातून दोन-तीन दिवसांत नैऋत्य मान्सून माघारीसाठी अनुकूल परिस्थिती आहे. यावर्षी भारतात मान्सूनचा पाऊस 2018 नंतरचा सर्वात कमी राहिला आहे. ‘एल निनो’ हवामानाच्या पॅटर्नमुळे (El Nino weather pattern) ऑगस्ट महिना शतकातील अधिक काळ सर्वात कोरडा ठरल्याचे भारतीय हवामान विभागाने शनिवारी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.