मनवेल, लोकशाही न्युज नेटवर्क
येथील शेतकऱ्याचा चोपडा तालुक्यातील मितावली येथे शेतातील काम करीत असताना उष्मघाताने मृत्यू झाल्याची घटना दि.१३ मे रोजी दुपारी एक वाजेच्या दरम्यान घडली.
मनवेल येथील रहिवाशी हुकूमचंद लक्ष्मण पाटील (६७) यांचा मालकीचा शेतात जे.सी.बी.मशीनने शेतात काम करीत होते. वाढत्या ताममाने त्यांची अचानक तब्बेत बिघडली आणि यादरम्यान त्यांचा शेतातच त्याचा मृत्यू झाला. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांच्या पत्शात पत्नी, एक मुलगा, तीन भाऊ, पुतने असा परीवार असून चिंतामण, विठ्ठल व शिवाजी पाटील यांचे भाऊ होते.